महाराष्ट्र राज्यातील २४६ नगरपरिषद ४२ नगर पंचायत निवडणुक मतदान दिनांक २ डिसेंबर २५ रोजी होणार असून निकाल ३ डिसेंबर निकाल लागणार, यासाठी आज दि. ४ नोव्हेंबर २५ पासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले असल्याने निवडणुकीचा धुराळा उडाला आहे.
ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.७ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी जाहीर होणार आहे. ईव्हीएम द्वारे निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
राज्यात नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
आज राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबर २५ ते १७ नोव्हेंबर २५ कालावधी. उमेदवारी अर्ज छाननी १८ नोव्हेंबर २५ रोजी, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे २१ नोव्हेंबर पर्यंत तर चिन्ह वाटप २७ नोव्हेंबर तर निवडणूक मतदान २ डिसेंबर रोजी होणार असून, निवडणूक निकाल निकाल ३ डिसेंबर २५ जाहीर होणार आहे.























